Wednesday, October 27, 2010

मराठ्यांचा राजा छत्रपती संभाजी..

ते 'राजे' नव्हतेच. विदुषकी पोशाखात बाद्शहासमोर पेश केले जाणारे 'बळी' होते. राजचिन्हाची एकच खुण नाचिज म्हणुन कुनीही उचकटुन न टाकल्याने त्यांच्या अंगावर तशीच होती आणि तीही आबासाहेबांनी दीनरात छातीवर वागविलेली.चौसष्ट कवड्यांची फक्त भवानी माळ ! संगसोबतीला एकच माणुस होते - कुठल्या कुठे कनोज देशात उपजलेला एकमेव कवी - छंदोगामात्य- कुलएख्त्यार कुलेश.
सरदारखान, हमिदुद्दिन, इखलास-मुकर्रब यांनी कैदयांना चौफेर कडेकोट घेर टाकनारी फौजेची हत्यारबंद शिस्त लावुन घेतली.
हात रश्यानं जखड्लेल्या दंडात काढ्ण्या आवळ्लेल्या कैद्यांच्या भोवती हजारो हशम तळ्पत्या नंग्या तेगी नाचवत हारीने उभे ठाकले.

शाही शहाजणे, तुता-या, नगारे, चौघडे यांची एकमेकात मिसळ्ती घोष गर्दी उसळ्ली.
बेहोश हशमांनी नरड्याच्या घाट्या फोडत किलका-या उठविल्या -
"धी~न धी~न."

निघाली काफर कैद्यांना कडेकोट बंदोबस्तात घेराने जखडुन धिंड निघाली. औरंगजेबाच्या पु-या हयातीत त्याने सग्या भावांपासुन कैक गनीमांची बेरहम कत्तल केली होती. पण आज त्याच्या हुकमाने निघनारी ही अशी पहिलीच धिंड होती. का घेतला होता त्याने असा निर्णय ?
एकाच हेतुने. ही अशा धिंडेची खबर मराठा मुलुखात गावोगाव पांगेल - वार-यासारखी. ती एकुन हाय खाल्लेले जिंदे मरहट्टे आपसुक झकत येतील तसलीम करत मन्सबीची खील्लत मागायला. पडला मराठी मुलुख एकदाचा. की करुन टाकता येइल कांजीवरमपासुन तहत काबुल पर्यंतचा पट्टा इस्लामचा बंदा !! आनि त्या आफाट सल्तनतीची राजधानी देहली !


मोतद्दारांनी हाती धरलेले कैद्यांचे काढनीबंद खेचले. राजे - कुलेश तिरपागडत त्या झट्क्याबरोबर ओढ्ले गेले.
भवतीच्या जमावातुन शेलक्या शिव्या कल्लोळू लागल्या -
"नाबका~र लई~म, मोजदा - खिंचो कसके शैतानोंको !"
गेल्या नऊ वर्षात याच संब्रुरुपी संभाने त्यांची बुर-हानपुर, औरंगाबाद अशी कैक ठानी तसनस केली होती.
कैक सुरम्या लढ्वय्यांना मौतीचे कंठस्नान घातले होते. फकीर फकीराण्याला जिम्मा रोजचा नमाजसुद्धा
नामुमकीन केला होता. त्यांचा हा नुसता घुस्साच नव्ह्ता - शक्य असते तर सपासप हत्यारे चालवुन त्यांनी
दोन्ही कैद्यांचे एकाच गोळ्यात केव्हाच गाठोडे केले असते.


जे पाय रूजाम्यांच्या पायघड्यांवरुन आत्मविश्वासाने रुपत, चालत आजवर आले होते तेच छत्रपतींचे रक्तदाट
गुब्बार पाय आज पेडगावच्या वाळ्वंटात फरफटत चालले. ज्या देहाने रायगडावर सोन्याच्या झुलेनं सजलेल्या
हतीवरुन राजा म्हणुन मिरवुन घेतले होते तोच जखडबंद देह धिंडीचा भोग भोगु लगला.


बहादुरगडात दिवान इ आमचा दरबार खचाखच भरला होत. त्यात सगळीकडुन आलेले मोगली सरदार,
सर्जाखाणासारखे इदलशाही, कुतुबशाही सरदार, सर्वात आघाडीला शह्जादे कदमबर नजर बांधुन दरबारी रिवाजाप्रमाणे खडे होते.
'' पेश करो दरबारके सामने नापाक काफ़र कैदियोंको !'' आसदखानाने आपल्या अली हजरतांचा हुकुम मुकर्रबला सुनावला.
मुकर्रबने इखलासला नजरइशारत करताच दहापाच हाशमांनी घेर टाकलेले, दख्खनेत आल्यापासुन औरंगला घोर
लावलेले दोन्ही कैदी दरबार्च्या मधोमध पेश घालण्यात आले. कैदी ताठ होते. कधी नव्हत्या
एव्हढ्या आनंदाच्या उकळ्या बुढ्या औरंगच्या काळजात उसळुन उठल्या. कधी भुलून वा चुकुनही तो दरबारी
रिवाज मोडत आला नव्हता. पण आज नकळतच तो त्याच्याकडून मोडला गेला. ताडकन तो आसनावरुन उठला.
कैदी संभाजीराजे आणी कुलेश यांच्या गर्दनी एव्हढ्या घेरावातसुद्धा ताठ खड्याच होत्या.
झाली ! आज ह्या क्षणाला आग्य्रातल्या दरबारानंतर मराठी दौलतीचे छत्रपती संभाजीराजे आणि दिल्ली तख्ताचा
शहेनशहा मुहम्मद औरंगजेब यांची इतकी वर्षे कुचमलेली नजरभेट झाली. जसे मानसातल्या मर्दपणाला
राजकारणातले गाळीव कपट न्याहाळत होते ! काफरी जिंदादीलीला तख्तनशीन शाही मगरुरी पारखत होती.
या क्षणी मात्र एक चमत्कारीक खयाल त्याच्या मनाला धडक देऊ लागला.


"कैसे पैदा करते हैं परवरदिगार ऐसे बेडर सुरमा शख्स काफरों कें खोकमें ? नही तो हमारा कमअस्सल
बगावतखोर बच्चा ! क्या नाम भी रख्खा हमने उसका शाही शोहरतसे - बडे आब्बाजान की याद जागाने -
अकब्बर !!"


झाली खुशी कुठेतरी बाहेर ओतुन टाकण्यासाठी बैचेन झालेला शहेनशहा हिंदोस्थान सिंहासनासमोरच्या
रुजामेदार पाय-या शांतपणे उतरुन आज पहिल्याने दरबारी मसनदीच्या गालिच्यावर आला. झणभर
त्याने दरबारभर नजर फिरवली आनि मक्केकडे तोंड करुन, आस्मानाकडे बघत त्याने खुशीच्या
नमाजासाठी गुढगे टेकले. !!!
दरबाराबरोबर छत्रपती संभाजीराजेही तो नजारा बघत होते. एवढ्या जीवघेन्या विटंबनेनंतरही
त्यांच्यातला 'बुधभुषणम' चा रचनाकार काव्यप्रेमी, मराठ्मोळा जातिवंत राजा उफाळुन आला.
छंदोगामात्य कवी कुलेशांच्याकडे रोखुन बघत भरला दरबार थरकुन जाईल अशा संथ पण
ठणठणितन राजबोलीत ते म्हणाले,
"छंदोगामात्य, करुन दावा या औरंगला बघताना काय वाट्तं त्याचं काव्य ! या क्षणी !
हाती कलम नाही असं न म्हणता !"
कवी कुलेश त्या नुसत्या शब्दांनीच ढवळुन निघाले. झट्कन गर्दन वर घेत कनोजी शब्द आपोआप
त्यांच्या ओठातुन त्वेषाने बाहेर प्रकटले - जो आग्या - सुनिए -


"राजन् हो तुम साँचे खुब लडे तुम जंग !
तुव तप तेज निहारके तखत त्यजत औरंग !!"

No comments:

Post a Comment