Wednesday, October 27, 2010

खंडोजी बल्लाळ !

जुवे बेट मराठ्यांनी ताब्यात घेताच विजरई हबकला. आता त्या बेटावरुन एक खाडी पार केली की जुन्या गोव्यातच मराठ्यांचा प्रवेश होनार होता ! भयकातर झाल्या फिरंगी पाद्रयांनी, विजरईच्या तातड़ीच्या आज्ञेने सेन्ट झेवियरच्या चर्चमधील घंटा धोका म्हनुन रात्रीच्याच अखंड बदडायला सुरुवात केली ! बिचोलीहुन आलेला अकबर ही या हल्ल्यात राजांबरोबर होता. एकदा त्याने जंजी-यावर खाड़ीच भरुन काढु बघनारे राजे प्रत्यक्ष समोर पाहीले होते.
आता गोव्याची खैर नाही हे तो मनोमन जानुन होता. जुवे घेतल्याच्या दुस-याच दिवशी विजरई चारशे सैनीकांसह भल्या पाहटेच, ते परत घेन्यासाठी खाडी पार करुन निकराने चालुन आला. टेकडीवरचे राजे, त्याला टेकडी चढु देन्यासाठी प्रथम गुमान राहिले. तो मा-याच्या ट्प्प्यात येताच टेकडीवरुन दगडी गुंड बरसवत राजे सैन्यासह टेकडी उतरु लागले. " पळा ~ पळा~ ! " चालुन आलेले फिरंगी मांडाची घोडी, नीट टेकडी उतरेनात म्हनुन ती टाकुनच पळु लागले. त्यांना कळेना मावळ्यांचं भिर्यं केवढ आहे ! यातच बगलेने आलेली तिनशे स्वारांची कुमक राजांना मिळाली. जुवे बेटाच्या लगतच्या टेकड्यांवरुन गोव्यातले फिरंगी विचित्र नजारा बघु लागले. उतरंडीवरुन तेगी पेलत धावुन येनारे मावळे आनी विजरईसह जीव घेवुन पळ्नारे फिरंगी ! चार मावळ्यांनी विजरईचा घोडा घेरलेला बघताच काळ्जे चरकली फिरंग्यांची. डोम रोड्रीगो घोडा फेकत विजरईच्या मदतीला आला म्हनुन जीवे वाचला तो ! तरीही तलवारीचा एक निसट्ता वार बगलेला बसुन घायाळ झालाच तो. रोड्रीगो केवढ्याने तरी ओरड्ला - "खाडी पकडा पळा." भेदरलेला, रक्तबंबाळ विजरई खाडीच्या रोखाने जीव तोडुन जनावर फेकु लागला. त्याच्यावरच नजर खिळ्वुन समोरच्या फिरंगी धारक-यांशी लढ्ना-या राजांनी आपला 'चंद्रावत' कौशल्याने बाहेर काढ्ला. विजरईच्याच पाठ्लागावर फेकला. टेकडीवरच्या बघ्यांना कधी नव्हे असा नजारा बघने भाग पड्त होते. पुढे घायाळ, जीव बचावण्यासाठी दौड्नारा आपला पार भेदरलेला विजरई कोंद-द-अल्वोर आणि त्याला गाठ्ण्यासाठी तलवार पेलुन धावनारा सैतान 'संबा !' राजे एकलेच विजरईच्या मागे धावताहेत हे पाहुन चलाख खंडोजीनेही आपला घोडा त्यांच्या मागे दौड्ता काढ्ला. गर्जत्या, फेसाळ्त्या, भरतीच्या खाडीतच भेदरलेल्या विजरईने घोडा घातला. पुरा गर्भगळीत झालेला विजरई प्राणभयाने सपासप खारट पाणी तोडत मधे उभी असलेली होडी गाठ्ण्यासाठी जिवाचे रान करु लागला. होडीही त्याच्या रोखाने सरकु लागली. चन्द्रावतासह खाडीकाठाकडे दौड्नारे राजे चुट्पुटत ओरड्ले -"सोडू नको त्यास ! उभी गावे जाळ्तो - बाट्वतो -" आणि पाठ्लागावरच्या बेभान,संतप्त राजांनी मांडाखालचा चंद्रावतच अनावर चुट्पुटीने दमदार टाच भरत थेट खाडीतच घुसविला !! खारट पाण्याचे चौफेर फव्वारेच फव्वारे उडाले. दहा हात आत घुसलेला चंद्रावत खाडीच्या, भरतीच्या ओढीला हां-हां म्हनता वाह्तीला लागला. विजरईने होडी गाठ्लेली बघुन आणी त्याला मारायला धावुन येनारा 'संबाच' घोड्यासह वाह्तीला लागलेला बघुन टेकडीवरचे बघे जल्लोषाने टाळ्या पिटु लागले. राजे चंद्रावताच्या रिकिबीतील पाय आता सोडवू बघत होते. ते सुटले. एका हाताने वहातिचा चंद्रावत आवरत दुस-या हाताच्या बलाने तरंगते राजे चंद्रावतासह वहातिला लागले. टेकडयावर आता टाळ्या-आरोळ्यांचा पाउस पडू लागला. एकच क्षण पण उभे आयुष्य सरकवून गेला तो राज्यांच्या डोळ्यासमोर. मराठी दौलतच खारट पाण्यावर वहातिला लागली. आणि टेकडीवरील बघ्यांची दातखिळच बसली. त्याना घोड्यावरुनच एक माणुस जिवाच्या आकांताने खाड़ीच्या पाण्यात झेपावताना दिसला. सपासप हात मारत त्याने 'संबाला' पाते लवायच्या आत गाठलेही. आपल्या हाताची जोड़ देत देत तो वाहना-या संबाला खाड़ी काठाकडे आनु लागला. कायदे राजांच्या हातातून सुटताच चंद्रावत ही आंगच्या बलावर पोहोत काठाकडे निघाला. घोड्यावरून पाण्यात झेप घेणारा तो पानीदार वीर होता

खंडोजी बल्लाळ !

संभाजी महाराजांनी खंडोजीला पालखीचा मान दिला.. !

No comments:

Post a Comment